A Neocortical Orchard

It was my beloved grandmother, a pious lady who believed in all the Gods- old and new, who introduced my old enough to be curious self to the amazing text that Bhagawad Geeta is. I’ve always loved Mahabharata more than Ramayana. Even as a young kid, I understood that Ramayana is ideal. The stories in Mahabharata felt like they could be applied in real life. And while my grandmother narrated various political plots of Mahabharat, my grandfather, a very frank man who believed in making his grandchildren aware of the kauravas of the real world, gave apt analogies to the plots and characters, much to the horror and disapproval of my grandmother! Each time my grandmother mentioned Bhagawad Geeta, I asked her what exactly is written in it. As a child, I expected concrete answers, word to word recitation from my grandmother who I firmly believed was an expert in all Godly matters. How could she not know a very important part of the story? Mahabharata was always told with a huge part of the puzzle missing.

I found this missing piece of the puzzle in my seventh standard. One busy day in school, the tiny, greasy haired girl in an over- sized uniform that was me, found out that there was a Bhagawad Geeta competition organized by the ISKCON temple. They would be distributing the text to the participants at a discounted price. I only enrolled myself for the exam to be able to procure that text. A text only a few centimeters longer than my father’s palm, had the tiniest print and the longest words and was really thick.

Getting the text in my hands and finding for it a place in my home and heart started a reaction that I can’t see an end to. Nadkarni Sir’s video mentions that rituals are like the outer layer of spirituality. My experience makes me agree. The first time I read the Bhagawad Geeta, it influenced my whole being. The next two years were a whirlwind of coming to believe in a God (which wasn’t the case earlier. Every pinch of haldi- kunku, flowers and rice grains offered was a product of parenting rather than a heartfelt offering.) I performed the puja daily with extreme love and care, not because I believed they reached my beloved, but because I didn’t know a way to express my respect towards Him otherwise.

Somewhere up the journey, all this took a backseat. To be honest, I can’t realize or remember why. I started becoming more empiricism driven and took an immense interest in all things cerebral. Little did I know that the most cerebral part to be discovered is in the text that time put aside for me. In the same period, my aunt started learning the Geeta and Upanishads, too. Seeing her make meaning of the stressors in her life in the light of these texts made me observe what a strong source of coping these texts can be. This was an important takeaway for me from that period, which was otherwise personally quite unspiritual.

Come twelfth standard, I found out that a long lost family friend takes Geeta chanting classes. I eagerly enrolled. I wanted to go back to the road that I couldn’t figure out why I strayed away from. The classes focused more on the complex pronunciation rules than the complexity of application the shlokas have in day to day life. It was a great and a different experience nevertheless. I love chanting the shlokas, even today. It brings a certain calm, enough to sooth the boiling irritated nerves, yet not too much to put me in a state of inaction. I find myself to be very focused, productive and creative after I’ve chanted any one chapter. Yet, I don’t believe this experience to be unfathomable, even if it doesn’t lie in the strict scientific domain. I just can’t wait to be evolved and learned enough to comprehend why and how chanting affects the way it does.

After the class concluded, I strayed away again. That’s right, I’m clearly a baby in the world of spirituality who hasn’t learned to walk in a straight line yet! I remember a day from my chanting class too vividly though. A talk was arranged in the class to discuss interpretations of a few shlokas in the esteemed Dnyaneshwari. I cannot remember the name of the speaker, but I remember his appearance and mannerisms clearly, owing to the amazing experience I had during that talk. Never had I ever met a person so engrossed in the meaning of a text. Never did I know that two lines could hold so much depth in them. He explained a certain shloka where the description of a Krishna idol is given. He elaborated on how it isn’t the description of an appearance but that of care and gentleness. All the ornaments that Krishna is made to wear are significant to his Godliness. If only my writing was fluent enough to contain the magnanimity of the realization that I had that day! It was the day I understood that I needed to read not just the Geeta, but a sea of other related literature.

It was after two years that one of my psychology professors in college, Sagar Vidwans sir made an effort to make us understand how positive psychology and ancient Indian texts went hand in hand. At this point the texts started holding an importance for me not just personally, but also because of the line of education I had chosen and the line of work I would choose in the future. I realized that if I had to become a mental health professional working in India, I needed to dive into the wisdom that these texts offer and learn how they’re applicable to coping with present problems- the very topic Mind FeAst would be dealing with this year.

Today, I confess I’m not reading any text actively. As I said, I chant the Geeta sometimes. I’m in a space where I would like to think I never strayed from finding spirituality suited to myself. I just think the speed varies from time to time, from context to context. Sometimes I sprint my way to absorbing relevant meanings, sometimes I jog my way as slowly as I do at Shivaji Park everyday. I also think I need more sensibility, more depth to my thoughts before I can really get into reading and interpreting something so beautiful. Like you need a certain fertile bed before you can sow something with the intention of growing a beautiful orchard. I have the notion that I’m not yet ready. Though that doesn’t mean I shouldn’t start.

I’m going to pace up again at this year’s Mind FeAst. I can’t wait for two of my favourite disciplines – psychology and spiritual literature to come together. I hope this helps in the germination of one seed in the orchid of my sensibility.

-Ketaki Joshi.

Attaching the links to the video that triggered this journey down the memory lane.
Do find out what Mind FeAst has in-store for by watching this interview of Dr. Anand Nadkarni sir:

नगर वेध २०१९

आय. पी. एच संस्थेचा वेध म्हणजे मुळातच अर्थपूर्ण , ऊर्जादायक संवादाची मैफल. जीवनात संघर्ष करून यशस्वी ठरलेल्या गुणी, मेहनती व्यक्ती, जेव्हा त्यांचे अनुभव, स्वतः प्रेक्षकांसमोर मोकळेपणाने सांगतात, तेव्हा ऐकणारा प्रेक्षक जणू नकळत एका अनोख्या ऊर्जातरंगाने प्रफुल्लित होऊन, स्वतःला काय करावंसं वाटतं आहे, काय करायला आवडेल, काय करता येईल, याचा विचार करू लागतो. 

नगर वेधचे हे चौदावे वर्ष . या वर्षीची थीम होती “नो एक्सक्यूझेस – नो सबबी” – न हरता, न थकता, न थांबता. 

I I सबबी सुंदर लोभसवाण्या, मनाभोवती घालती पिंगा I I
I I कशी मिळावी दिशा उद्याची, सुरु जोवरी यांचा दंगा I I 

पहिल्या सत्राची सुरुवात या खणखणीत वेध गीताने झाली. दीड मिनिटांची पाहुण्यांची ओळख करून देणारी सुंदर ध्वनी चित्रफीत दिसली .आणि स्टेजवर आली “राखी कुलकर्णी ”. एखाद्या ‘नाजूक, सुंदर, लोभसवाण्या’ कॉलेज कन्येसारखी वाटणारी राखी, ‘ प्लास्टिक मुक्तीबद्दल’ जनजागृती करण्यासाठी वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सलग भारताच्या सर्व राज्यात एकटी फिरली, ही गोष्टच खरंतर चकित करणारी! पण प्रत्यक्षात तिचे अनुभव ऐकताना तिच्यातली जिद्द, हिंमत, आत्मविश्वास आणि जगाच्या चांगुलपणावरचा विश्वास, यांनी प्रेक्षक भारावून गेले. 
स्वतःच्या डोळ्यांनी जग बघितल्याचा अनुभव माणसाला संपन्न बनवतो. जगात वाईटापेक्षा चांगले लोक जास्त आहेत. या भ्रमंतीनंतर, मनातले अनेक भ्रम दूर झाले आणि ती अधिक नितळपणाने लोकांमध्ये मिसळू लागल्याचं राखीने सांगितलं. 

दुसरे सत्र … पुन्हा एक मनात घोळत राहणारं वेध गीत…. 

I I मन की धुन में मगन रहो तो, सुख दुख से क्या लेना देना I I
I I घनी रात या नया सवेरा, आसमान को बस हैं छूना I I
I I अपनी धुन में मगन ही रहना…. I I 

दीड मिनिटांची परिचय चित्रफीत आणि स्टेजवर आले श्री. प्रदीप देवकुळे – भारत सरकार च्या ‘ मिशन मंगल’ आणि ‘चांद्रयान – २’ मध्ये सहभागी झालेले शास्त्रज्ञ. मुळचे नगरचे रहिवासी असलेल प्रदीप देवकुळे यांना, मुलांच्या आणि मोठ्यांच्या मनातले अनेक कुतूहल प्रश्न विचारत डॉ. नाडकर्णींनी बोलतं केलं. नगर जवळच्या भिंगार गावात शिकलेला मुलगा इसरो सारख्या आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्रात काम करून आपला वेगळा ठसा उमटवू शकतो, हे उमजल्याने मुलांच्या मनातला हुरूप कितीतरी वाढला असेल. 
प्रामाणिकपणे, मन लावून कष्ट केले तर त्याचे चांगले फळ मिळतेच. कोठेही राहिलं, तरी साधेपणाने, कुटुंबीय आणि जन्मभूमी यांना न विसरता राहिले पाहिजे. आपले निर्णय, योग्य विचार करून स्वतःच घ्यावेत. फक्त पैसा, हे करीयरचे ध्येय असता कामा नये. अशा अनेक गोष्टी या संवादातून स्पष्ट झाल्या. 

तिसरे सत्र …. आणखी एक सुस्वर वेध गीत….

I I कुंपणे तोडुनी सारी , विरघळून गेले काही I I
I I काळाने द्यावी दाद, हा हट्ट ही धरला नाही I I 

अमिरकेत शिकल्यावर, भरपूर पैसे मिळवून देणारा जॉब आणि व्यवसाय सोडून, स्वतःच्या मूळ गावी, म्हणजे म्हसवडला परत आलेले आणि स्वतःच्या गावातल्या, तळागाळातल्या समाजातले गुणी खेळाडू निवडून त्यांना प्रशिक्षित करून ‘माण देशी चॅम्पिअन्स’ घडवणारे प्रभात सिन्हा स्टेजवर आले.
सोबत होती, जनावरांमागे धावता धावता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये पदके मिळवणारी वैष्णवी सावंत आणि दुधाचे रतीब घालता घालता,नॉरवेचा ‘आयर्न मॅन’ झालेला अभय केळकर. त्यांचे अनुभव ऐकताना, प्रेक्षक एकाच वेळी अचंबित आणि रोमांचित होत होते. या तरुणांचे धाडसी अनुभव आणि डॉ. नाडकर्णींची अवखळ संवादशैली, या मुळे हे सत्र विशेष रंगले. ‘मेंदू, मन आणि मनगट यांच्या एकरूपतेमुळे तुम्ही कोणतेही अचाट वाटणारे साहस सुद्धा करू शकता’, हे अभय केळकरचे वाक्य प्रेक्षकांच्या मनावर जादू करून गेले. 

मध्यंतरानंतर सुरु झाले चौथे सत्र … चौथे वेध गीत… 

I I मानमान्यता सुखसुविधांची आली झालर रुबाबदार, ध्यास उरातील तरी ना संपे, देत रहाव हाच विचार I I
I I कसे होतसे वादळ शहाणे,चला घेऊया त्याचा शोध,मने फलवतो, प्रेरक होतो, अंतरातला प्रकाशझोत I I 

स्टेजवर आपल्या नहमीच्या पारंपारिक नऊवारी साडी आणि नथ घालून आल्या, संपूर्ण जगातल्या कर्तबगार महिलांमध्ये समावेश झालेल्या कोंभाळणे गावातल्या बीजमाता, राहीबाई पोपेरे. त्यांच्या साध्या सुंदर ग्रामिण भाषेत त्यांनी ‘जुने ते सोने’ समजून त्याची नव्याशी सांगड कशी घालावी, हे छान समजावून दिले. शेतीमध्ये शिरलेलं हायब्रीडचं भूत उतरवायला त्यांनी प्रथम एकटीने पदर खोचून आणि नंतर गावच्या महिलांना एकत्र करून, पुढे चक्क देशी बियाणांची बॅंक कशी सुरु केली, हे सांगितलं. आयुष्यात शिक्षणाची संधी न मिळालेल्या राहीबाईंकडे दशी विदशी विद्यापीठातले विद्यार्थी शिकायला येतात आणि राहीबाई त्यांना शिकवतात, हे सगळं ऐकून प्रेक्षक थक्क झाले. 

त्यानंतर पाचवे आणि अखेरचे सत्र सुरु झाले… 

I I लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी I I
I I जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी I I 

सर्व माणसांच्या मनातलं मराठीपण जागं करणाऱ्या मराठी अभिमान गीताच्या पार्श्वभूमीवर संगीतकार कौशल इनामदार स्टेजवर आले आणि त्यांनी गाण्याबद्दलच्या गप्पांनी वातावरण मोहरून टाकलं. सव्वा वर्ष जे गाणं तयार करायला घालवलं, देशभरातले ५०० च्या जवळपास लहान मोठे गायक – वादक यांच्याकडून गाऊन घेताना, कोणत्या अडचणींना तोंड दिलं, पण अखेर पूर्ण जगातल्या मराठी माणसांच्या मनात ते गाणं जाऊन बसलं आणि आर्थिक अडचण आली तेव्हा लोकांनीच मोठा निधी जमा करून दिला.. स्वतः संगीतकार होऊ असं त्यांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत वाटलच नव्हतं. अशा अनेक गमती जमती या व्यासंगी संगीतकाराने सांगितल्याच आणि मध्ये मध्ये सुस्वर गाणीही गायली … सत्र संपताना प्रत्यक्ष संगीतकारासमवेत विद्यार्थी , पालक, आमंत्रित… सगळे प्रेक्षागृहच 

I I हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे I I
I I माणसाने माणसाशी माणसासम वागणे I I 

या प्रार्थनागीतात मुक्तकंठाने सामील झाले आणि ‘नगर वेध २०१९’ वेगळ्याच उंचीवर पोहोचला. 

प्रत्येक सत्रात डॉ. आनंद नाडकर्णींची संवाद शैली अनुरूप पद्धतीने सुयोग्य रूप घेत होती. कधी खेळकर, कधी गंभीर, कधी अवखळ – मिश्किल, तर कधी विनोदी. पण प्रत्येक मान्यवराशी संवाद त्यांनी ‘नो एक्सक्यूझेस, नो सबबी’ या घोषवाक्यावर ज्या पद्धतीने आणला, ते कौशल्य अप्रतीम! डॉक्टरांचा स्टेजवरील प्रसन्न वावर आणि प्रगल्भ रसपूर्ण विवेचन यामुळे वेधचे प्रत्येक सत्र प्रेक्षकांसाठी आनंदानुभव ठरला. 

२०१९ पासून सुरु झालेली , नेमक्या शब्दात मान्यवरांची ओळख करून देणाऱ्या ध्वनिचित्रफिती ही नगर वेधची एक चांगली प्रथा. कोणत्याही सबबी न सांगता, न थांबता, न थकता, न हरता, आपल्या ध्येयाकडे चालत रहायचं, हा विचार उपस्थित प्रेक्षंकाना प्रभावीपण समजल्याचे ते सांगतात. या व्यतिरिक्त इतरही अनेक सदविचार या मुलाखतींतून व्यक्त झाले. 
● जी गोष्ट व्हावी असं आपल्याला वाटतं, ती इतरांनी करावी म्हणून न थांबता, स्वतःच सुरुवात केली पाहिजे. 
● संकट प्रसंगी स्वतः निर्णय घेऊन खंबीरपणे निभावले पाहिजेत. 
● सद्हेतूने केलेल्या प्रयत्नांना आपोआप लोकांची साथ मिळते. 
● आपण जीवनात जे कर्तृत्व करतो, यश मिळवतो, यात आपले जन्मदाते आणि कुटुंबीय यांचा महत्वाचा वाटा असतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. 
● साहस करावं, पण सावध विचार आणि तयारी करूनच. 

पाचही सत्रांचा विचार केला तर एक समान सूत्र मिळते. तुम्ही कतीही लहान असा, तमचं राहण्याचं ठिकाण कोणतंही असो, तुमच्यापाशी पैसा किंवा साधने कमी असोत, परंतु निश्चय, मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या जोरावर, तुम्हाला यश मिळतेच मिळते आणि त्यातून मिळणारे समाधान तुमचे जीवन समृद्ध करते. 

अशा रीतीने ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या सुंदर गीताचे स्वर मनात घेऊन प्रेक्षक माउली सभागृहाबाहेर पडले, आणि ‘नागर वेध २०१९’ ची सांगता झाली . 

– सुनंदा अमरापूरकर

अहमदनगर वेध २०१९

सप्टेंबर पासूनच वेधचे वेध सुरु होतात. यावर्षी सप्टेंबरमध्ये नाशिकचा वेध संपन्न झाला आणि काल रविवारी १७ नोव्हेंबरला अहमदनगरचा वेध संपन्न झाला. नेहमीसारखी या रविवारची पहाट आळसावलेली नव्हती. पहाटे साडेचारला उठलो कारण रात्री पासूनच वेध लागले होते अहमदनगर वेधचे ! सुनील बरोबर साडेपाचला गाडी घेऊन दारात हजर झाला आणि मग डॉक्टरांना (आनंद नाडकर्णी) घेण्यासाठी पत्रकार नगरमधील बाबाच्या (अनिल अवचट) घरी, तेथून प्रवास सुरु झाला नगरच्या दिशेने. वाटेत गप्पा –टप्पा सुरु असतात, ७ -७.१५ ची वेळ- डॉक्टर सुनीलला एका हॉटेलकडे गाडी वळवण्यास सांगतात. डॉक्टर मला माहिती देतात, कानिफनाथची (हॉटेल) मिसळ तात्यांना (सदाशिव अमरापूरकर) फार आवडायची. आम्ही अनेक वेळा येथे थांबतो. अर्थातच मिसळीवर ताव मारला व पुढे नगरकडे प्रस्थान ठेवले. ८.३० ला नगरच्या ‘माउली’ सभागृहावर पोहोचलो. आत रीमा अमरापूरकर,केतकी व सायली अमरापूरकर यांची स्टेज, लाईट्स, ध्वनी व्यवस्था यांची पहाणी व सूचना देणे सुरु होते.

९ वाजले आणि प्रेक्षागृह विद्यार्थ्यांनी भरून गेले. जवळ जवळ ६०० विद्यार्थी वेधसाठी शालेय युनिफाॅर्म मध्ये उपस्थित झाले. आणि ९.१५ ला वेधचा आरंभ स्व. सदाशिव अमरापूरकर यांच्या छायाचित्रास व समर्थांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सरस्वती वंदनाने झाला. नगरचा हा १४ वा वेध. १३ वर्षांपूर्वी स्व. सदाशिव अमरापूरकरांनी नगर वेधचा पाया रचला. आज ‘सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्ट’ व ‘श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ’ याच्या संयुक्त विद्यमाने स्व. सदाशिव अमरापूरकर यांच्या स्मरणार्थ वेधचे आयोजन करण्यात येते .

१४ व्या वेधचे सूत्र एकदम भन्नाट –“No Excuses नो सबबी” न हरता –न थकता –न थांबता असे होते. आपण नेहमीच काही तरी सबबी सांगत असतो. काही टाळण्यासाठी नवीन नवीन सबबी सुचतात. पण इथे तर नो सबबी हे सूत्र! उत्सुकता होती फॅकल्टींची! नावं तर माहिती होती, पण न थांबता –थकता काय केले यांनी, सबबी का नाही पुढे केल्या यांनी – हे जाणून घेण्याची उत्सुकता मनात जोर करत होती…..आणि व्यासपीठावर आली पुण्याची तरुणी राखी कुलकर्णी! पर्यावरणाला हानी करणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी होण्यासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने संपूर्ण भारताची “सोलो जर्नी” करणारी राखी एका ध्येयाने प्रेरित झाली आणि ५ नोव्हेंबर २०१७ ते ५ नोव्हेंबर २०१८ या वर्षात ३६५ दिवसात २९ राज्य तिने पालथी घातली –bag packer –म्हणून ! पाठीवर २२ किलोचे वजन, त्यात टेंट व समान! कधी पायी, कधी बस ,तर कधी रेल्वेने प्रवास ! कुठेही थांबावे ,टेंट टाकावा माणसांबरोबर मुक्त संवाद –भाषा येओ, न येओ –भाषेची मर्यादा नव्हतीच ! एकच इच्छा- देश जाणून घ्यावा, माणसांचे अंतरंग उमजून घ्यावे. या सर्व प्रवासात अनेक अनुभव आले. “अतिथी देवो भव” या संस्कृतीचे दर्शन पूर्ण भारतात दिसले तिला . ईशान्य भारताबद्दल अनेक गैरसमज आपल्या मधे आहेत ते या प्रवासात दूर झाले असे ती म्हणते. सिक्कीम चे त्यावेळचे राज्यपाल श्री. श्रीनिवास पाटील यांच्या आदरातिथ्याने ती भारावून गेली. तिच्या बोलण्यावरून असे वाटले की सबबी आपण उगाचच तयार करतो. सबबींमुळे आपण आळशी बनतो. नखरे करू लागतो.

राखी कुलकर्णी

राखी नंतर इसरोचे शास्त्रज्ञ प्रदीप देवकुळे यांनी चांद्रयान -२ च्या भारताच्या उपलब्धींचा मागोवा घेतला. “चूक करायला संधीच द्यायची नाही”, या विचारांवर आत्तापर्यंत काम करत आल्याचे ते म्हणाले.

प्रदीप देवकुळे

या नंतरचे सत्र होते “माणदेशी चॅम्पियन” चे प्रभात सिन्हा, अभय केळकर व रेश्मा केवटे या तिघांचे. अभय केळकर याने नुकताच नॉर्वेचा “Iron Man” हा किताब मिळवला आहे. रेश्मा ही ट्रिपल चेस या प्रकारात राष्ट्रीय खेळात सुवर्णपदक विजेती माणदेशी कन्या. ग्रामीण रत्नांना शोधून त्यांचे mentoring करण्याचे काम प्रभात सिन्हा त्याच्या संस्थे द्वारे करत असतो. त्यांच्या मुलाखतीचे निरुपण करतांना डॉ. नाडकर्णी म्हणाले ,”खेळ- हरायला शिकवतो, खेळ जिंकायला शिकवतो, मैत्री करायला शिकवतो. आयुष्याची लय सापडते- न हरता,न थकता,न थांबता !!!”

माणदेशी चॅम्पियन्स

नंतरचे सत्र होते “बीजमाता” राहीबाई पोपरे यांचे. राष्ट्रपतींच्या ‘नारी शक्ती सन्मानाने’ गौरवीत झालेल्या आहेत त्या. त्यांच्या खास ग्रामीण बाजात आपणास पर्यावरण रक्षणाचे महत्व सांगतात, “आपली जमीन खराब झाल्यावर डॉक्टर कोठून आणणार?” .साध्या ,सोप्या बोलण्यातून त्यांनी जीवनविषयक तत्वज्ञान मांडले. मी अशिक्षित आहे असे सांगणाऱ्या राहीबाईंचे अनुभवातून आलेले शहाणपण त्यांच्या पारदर्शक शब्दातून व्यक्त होत होते.


बीज माता” रहीबई पोपेरे

नगरच्या १४ व्या वेधची सांगता सुप्रसिद्ध संगीतकर कौशल इनामदार यांच्या मुलाखतीने झाली.

कौशल इनामदार यांच्या सत्रची छोटी झलक


दीपक पळशीकर.

किशोरची ‘किरणं’ वेध कट्टयावर !


पुणे वेध कट्टयावरची सायंकाळ काल चांगलीच रंगली. किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांच्यासोबत गप्पा मारायच्या होत्या. आम्ही पोहोचताच काहीच वेळात कार्यक्रम सुरू झाला.

किरण नावाचा एक मुलगा किनवटसारख्या नक्षलवादी, मागासलेल्या भागात राहतो. अनेक वेळा निरपराध तरूणांच्या नक्षलवादी या शंकेने झालेल्या हत्याही बघतो. मध्येच काही कारणानं शिक्षण थांबतं आणि त्या वेळी तो जीप, ट्रक सह वेगवेगळी वाहनं चालवायला लागतो. तेच आपलं काम असंही काही काळ त्याला वाटायला लागतं. या काळात मारामारी, थोडीफार दादागिरी त्यानं केली आणि त्याचा परिणाम १० ते ११ केसेस त्याच्याविरोधात कोर्टात दाखल झाल्या. या सगळ्या केसेसमधून त्याची निदोर्ष मुक्तता झाली. इथून आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं.

थांबलेलं शिक्षण पुन्हा सुरू झालं.
वडिलांनी दिलेला वाचनाचा वारसा, आईनं मुलासाठी ‘त्यानं खूप शिकावं’ हे बघितलेलं स्वप्न, त्याचे प्रोत्साहन देणारे शिक्षक, किनवट चा सुंदर निसर्ग आणि मिळालेले अनुभव यातून किरण खूप शिकला. अपेक्षित प्रश्नसंच विकत घेऊन द्यावा म्हणून किरणनं आपल्या आईजवळ हट्ट धरला. तिनं ती पुस्तकं दिली नाही तर मी नापास होईल असं किरणनं म्हटल्याबरोबर किरणची आई चपापली. हा खर्च अशक्य असतानाही तिनं एका बांधकामाच्या साईटवर जाऊन मजुरी करायला सुरुवात केली. किरणनं हे दृश्य बघितलं तेव्हा आपल्यासाठी तिला झालेला त्रास त्याला अस्वस्थ करून गेला.
बाबा आमटे यांच्या श्रमछावणी संस्काराचा परिणामही किरणवर मोठ्या प्रमाणात झाला.

किरण पुण्यात आला. इथल्या नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयात आणि रानडे इन्स्टिट्यूटमध्ये शिकला. आपला पहिला क्रमांक त्यानं कधी सोडला नाही. स्पर्धा परीक्षेतल्या यशानंतर मंत्रालयात माहिती विभागात साहाय्यक संचालक (गॅझिटेड ऑफिसर) म्हणून कामाच अनुभव घेतला. तिथे असताना लोकराज्य या नियतकालिकाचं काम अतिशय उत्तमरीत्या सांभाळलं. वाई इथे विश्वकोष निर्मितीत काम केलं.

मुलं हीच भविष्य घडवणारी आणि राष्ट्राला भक्कम बनवणारी असल्यानं त्यांचं वाचन, त्यांचं शिक्षण, त्यांची मानसिकता यावर खूप खोलवर विचार किरण करत असायचा. यातूनच त्याच्या मनानं ओढ घेतली आणि तो किशोरचा संपादक झाला. किशोर मासिकाचं महत्व महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे. किरणनं किशोरला आणखी सक्षम आणि सुंदर केलं. आबालवृध्द साऱ्यांनाच कल्पनेची सैर करून आणली पण त्याचबरोबर वास्तवाचं भानही दिलं. आज खेडयापाड्यातली मुलंच नव्हे तर शेतमजूर असो की एखादा अर्धशिक्षित प्लंबर – तो आवडीनं किशोर वाचतो.

ड्रायव्हर ते डायरेक्टर या प्रवासात किरणला पावलोपावली संकटं आली. पण त्याचा बाऊ त्यानं केला नाही. ड्रायव्हर म्हणून फिरताना त्यानं लाज बाळगली नाही, उलट त्या प्रवासाचा, प्रवासात भेटलेल्या माणसांचा आणि दिसलेल्या निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटला. फर्ग्युसन महाविद्यालयात असताना भाषेवरून, उच्चारांवरून, राहण्यावरून, पायात घातलेल्या स्लीपरवरून त्याला न्यूनगंडाची भावना निर्माण व्हावी असं वातावरणही काही काळ निर्माण झालं. पण किरणनं आपली मुळं सोडली नाहीत. ती घट्ट धरून ठेवली आणि तो जसा आहे तसा लोकांना त्याला स्वीकारावंच लागलं. जाईल तिथे त्याच्या रंगावरून त्याच्या जातीबद्दल कुतूहलानं विचारलं जाई आणि मानवता हा एकच धर्म मानणारा किरण वाट्टेल त्या जातीचा आणि धर्माचा उल्लेख करत असे. याचा परिणाम म्हणजे त्याला घर द्यायला कोणी तयार नसायचं. अशा वेळी वाईमध्ये तर किरणनं आपल्या शिपायाच्या घरी भाड्यानं राहायला सुरुवात केली आणि तिथल्या झोपडपट्टीतल्या १०० मुलांना शिकवायला सुरुवात केली.

किरणनं आपल्या मुलांची नावं निसर्ग आणि बेनझिर अशी ठेवली आहेत. तसंच शाळेमध्ये मुलांच्या फॉर्ममध्ये जात आणि धर्म यात मानवता एवढंच लिहिलं आहे. ते लिहितानाही त्याला संघर्ष करावा लागला. पण तो मागे हटला नाही.

‘किशोर’ला आणखी समृद्ध करण्यासाठी, मुलांच्या जाणिवांना नवीन पंख देण्यासाठी किरण सातत्यानं काम करतो आहे. त्याच्या कामाचा आनंद त्याला आणखी पुढे जायचं बळ देतो आहे.

मी मुलाखत संपवताना उपस्थितांच्या वतीनं आणि पुणे वेध कट्टाच्या वतीनं किरणला शुभेच्छा दिल्या. पुणे वेध कट्टा विषयी प्रदीप कुलकर्णी यांनी माहिती दिली, तर डॉ. ज्योती शिरोडकर हिने आभार मानले. आभार प्रदर्शन हा एक अतिशय कंटाळवाणा आणि रूक्ष पण तरीही आवश्यक कार्यक्रम असताना ज्योतीच्या तोंडून आभार ऐकणं हा नितांत सुंदर अनुभव असतो, जो कालही मी पुन्हा एकदा अनुभवला.

कालच्या कार्यक्रमात बेरीज-वजाबाकी या चित्रपटाचं प्रमोशन करायला शर्व कुलकर्णी हा अभिनेता आला होता. या प्रसंगी श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेल्या राजीव तांबेनं गमतीनं म्हटलं, मी बेरीज-वजाबाकी हा चित्रपट मुळीच बघणार नाही. कारण माझं गणित चांगलं नाही. मी जर हा चित्रपट बघितला तर उद्या तुम्ही भागाकार-गुणाकार असा चित्रपट काढाल आणि मग तीही गणितं मला येत नाहीत, अशा वेळी मी काय करायचं? राजीव तांबे याला वेळेवर असं बोलायला कसं सुचतं याचं मला नेहमीच कुतूहल वाटतं.
काल कल्याण तावरे, मधुरा-विप्रा, अर्चना जाना, महावीर-इंदुमती जोंधळे, जयश्री-विश्वास काळे, लेखिका रमा नाडगौडा, धनंजय सरदेशपांडे, रेणुका माडीवाले, आसावरी कुलकर्णी आणि ऐश्वर्या या सगळ्यांच्या उपस्थितीनं कार्यक्रमात जास्तच बहार आली. नेहमीप्रमाणेच दीपक पळशीकर/प्रतिमा पळशीकर, वृंदा असे सर्वच कार्यक्रमासाठी झटत होते. धनंजय भावलेकर आणि त्याची टीम खास करून व्हिडीओ शूट करण्यासाठी आली होती. कितीतरी वर्षांनी जोंधळे पतीपत्नीला भेटून इतकं छान वाटलं की शब्दच नाहीत.

वेध टीमच्या वतीनं गरमागरम वडापाव आणि चहा दिल्यामुळे तर सगळ्यांची कळी आणखीनच खुलली. मला स्वतःला अनन्या या गोड मुलीला भेटून छान वाटलं. अनन्याचं खेळातलं प्रावीण्य ऐकून अभिमान आणि आनंद वाटला.

घरी परतताना माझ्या डोळ्यासमोर काळ्या-सावळ्या रंगाचा, अंगात भडक रंगाचा शर्ट घातलेला, गळ्यात लाल रंगाचा रुमाल असलेला, हातात कडे आणि गळ्यात साखळ्या अडकवलेला आणि खिशात चाकू बाळगणारा एक तरूण दिसला. याच तरुणात बदल होत होत तो काहीच क्षणात मला वेगळाच दिसू लागला. हा तरूण पुण्यातल्या सेनापती बापट रोडवरच्या बालभारतीच्या इमारतीत एका पॉश केबिनमध्ये पुस्तकांच्या गराड्यात टापटीप रुपात बसला होता आणि मला बघताच हसत ‘दीपाताय, या’ म्हणत स्वागत करत होता!

– दीपा देशमुख, पुणे.

वेध कट्ट्याचा हा कार्यक्रम या link वर नक्की बघा!https://youtu.be/cTxYaqsFDqQ

बोलिले जे ऋषी, साच भावे वर्तावया

माझा जन्म झाला तो अशा कुटुंबामध्ये जिथे धार्मिक कर्मकांडांना फारसे महत्त्व नव्हते. आमच्या घरात देवाच्या तीन-चार प्रतिमा लावलेल्या होत्या. त्यांना रोजचा दिवा लावण्याचे काम आई वडील करायचे. ते दोघे गुरुवारचा उपवास करायचे. त्या वारी घरी, दत्ताची आरती असे. त्यानंतर नेमाने पेढा मिळायचा. हा सारा वारसा माझ्या भावाकडे गेला. मला कधी कोणी असे कर किंवा करू नको असे सांगितले नाही. परिणामी कधी पर्यटनाच्या निमित्ताने देवळात जाण्याची वेळ आली किंवा गणपती देवीच्या उत्सवांमध्ये कुठे दर्शनाला गेलो तरच नमस्काराची कृती घडत असे. त्यामुळे प्रौढ आयुष्यामध्येही कर्मकांड, मूर्तिपूजा, उपवास,  नवस ह्या सार्‍या पासून दूर राहिलो. हे सारे करणाऱ्यांचा दुःस्वास मात्र कधी केला नाही. अनेक तीर्थस्थळांमधला बकालपणा, विषमता अन व्यापार पाहिल्यावर तर अजूनही विषण्णता येते आणि चिडचिडही होते.

मेडिकलचा विद्यार्थी असताना, डॉ. रवीन थत्ते सरांच्या घरी ‘ज्ञानेश्वरी’ वर नियमित ज्ञानसत्रे असायची. आम्ही काही मित्र तिथे हजेरी लावायचो ते नंतरच्या सुग्रास जेवणावर डोळा ठेवून. सुमारे बावीस वर्षांपूर्वी, तणावनियोजनावरच्या प्रशिक्षण कार्यशाळा घेताना, भगवतगीतेमधील कर्मयोगावर प्रश्न विचारले जायचे. ‘मुकाट्याने आपलं कर्म करत राहायचं’ असा हा दैववादी सूर नक्की नसावा असे वाटले. पण बहुतेक जण त्याच पद्धतीने प्रश्न विचारायचे. सत्य शोधण्यासाठी म्हणून अभ्यास सुरु केला. संस्कृतमधली भगवतगीता डोक्यावरून गेली. आणि विनोबा भेटले. गीताई, गीता प्रवचने, गीताई चिंतनिका असे टप्पे पार करत विनोबांच्या समग्र साहित्याच्या, सहित म्हणजे सोबत चालायला सुरवात केली. हळूहळू गाथा, दासबोध, ज्ञानेश्वरी वाचनात आली. आधुनिक मानसशास्त्रातील Rational Emotive Behavior Therapy म्हणजे विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती आणि भारतीय अध्यात्म ह्याची सांगड घालताना, ‘विषादयोग,’ ‘मनोगती’ आणि ‘कर्मधर्मसंयोग’ अशी पुस्तके लिहिली गेली. त्या निमित्ताने विनोबांच्या सोबतच ओशोंपासून ते विवेकानंद, महात्मा गांधी, योगी अरविंद, जे. कृष्णमूर्ती, रामकृष्ण ह्याच्याबद्दल वाचत गेलो. महाराष्ट्राच्या भागवतधर्माचाही थोडा अभ्यास झाला.

असे होता होता गाडी वेदान्त-तत्त्वज्ञानाच्या टप्प्यावर आली. निमा आणि सूर्या असे वेदान्त शिकवणारे दोन विद्वान गुरु भेटले. (www.discovervedant.com ही त्यांची साईट पहा.) म्हणजे भारतीय परंपरेप्रमाणे ‘गुरु भेटणे’ हा टप्पाही पूर्ण झाला. आपल्या भारतीय तत्वज्ञान परंपरेमध्ये ‘दर्शने’ आहेत. म्हणजेच perspectives आहेत. हिंदू, बौद्ध, जैन, शीख असे चार धर्म ह्या संस्कृतिमधून निघाले. दरम्यानच्या काळात गौतम बुद्ध आणि त्याची मांडणी ह्याची जोड REBT ला कशी देता येईल ह्यावरही अभ्यास सुरु झाला. हे सारे अभ्यास कधीच पूर्ण होणारे नसतात.

सुमारे वर्ष-सव्वावर्षापूर्वी डोक्याने असं घेतलं की वेदान्ततत्वज्ञानाची मूळ मांडणी आहे उपनिषदांमध्ये. त्याचा अभ्यास केला तर आजवरच्या शोधाचे खोलवरचे मूलभूत अंग कळेल आपल्याला.

जे स्वतःला कळते आहे किंवा ‘कळले आहे असे वाटते आहे’ ते इतरांपर्यंत पोहोचवायचे हा माझ्यातल्या ‘कार्यकर्त्याचा’ किंवा ‘Activist’ चा भाग असला पाहिजे. आधुनिक मानसशास्त्राचा सांधा अध्यात्म-तत्वज्ञानाशी घातला पाहिजे हा हेतू घट्ट होण्याचे महत्वाचे कारण असे . . .  आमच्या मनआरोग्यक्षेत्राला स्वतःचा पाश्चिमात्य चेहरा न बदलता आल्यामुळे मनआरोग्य क्षेत्राचा ‘सांस्कृतिक’ आणि ‘सामाजिक’ ठसा निर्माण झाला नाही. अध्यात्मक्षेत्रातील शहाण्या आणि चतुर उद्योजकांनी (हा शब्द उपरोध नव्हे तर वास्तववादी आदराने वापरला आहे.) मात्र परंपरेतल्या शहाणपणाला positive psychology ची फोडणी विनासायास देऊनस्वतःचे Branding अतिशय भक्कम केले. म्हणून मनआरोग्यक्षेत्रातल्या अभ्यासकाने ह्या शास्त्राच्या अंगाने, अध्यात्माची आणि वेदान्ताची मांडणी करायला हवी.

सामाजिक वास्तवामध्ये, हिंदु धर्माचे व्यापारी, असहिष्णु आणि कर्मठवादी रूप नव्याने डोळ्यासमोर येत असताना इथल्या बहुसंख्य मंडळींसमोर धर्मामधल्या शहाणपणाची (wisdom) मांडणी नव्याने करणे जरूरीचे वाटले हा दुसरा मुद्दा. अशा कट्टरवादी रूपाची भूल सुशिक्षित तरुणांना पडत आहे तेव्हा ह्या निमित्ताने, वेदांत विचारातली कोणती तत्त्वे आपण दैनंदिन जीवनात समजून-उमजून वापरू शकतो हे सांगणे गरजेचे वाटले.

माझं पांडित्य सुशोभित पणे सादर करणे हा हेतू ह्या अभ्यासा मागे नाही. मी अजूनही स्वतःला अभ्यासक मानतो, ‘मुमुक्षु साधक’ नव्हे. ही माझी मर्यादा आहे आणि ती मी स्वीकारली आहे. ‘जिज्ञासू’ भक्त असल्याशिवाय तो ‘ज्ञानी’ होणार नाही ही गीतेतलीच मांडणी आहे. तर उपनिषदांच्या या शोधामध्ये पुन्हा वेगवेगळे धर्म व्यक्ती ते नव्याने भेटले.

माझ्या जगण्याचं नेमकं काय करायचं?

हा एक साधा पण मूलभूत प्रश्न हळूहळू प्रकाशात आला. माझ्या जगण्यामध्ये येतात माझी उद्दिष्टे (करीयर इत्यादी) माझी जीवनशैली, माझे नातेसंबंध . . .  ह्या सगळ्याबरोबरच दोन प्रश्न आपल्या डोक्यात असतात . . . मृत्यू म्हणजे काय? मृत्यूनंतर काय? पुनर्जन्म असतो का?

ह्या सगळ्या विषयांवर वेदान्ततत्वज्ञानाची निश्चित भूमिका आहे. उपनिषदे रचणाऱ्या ऋषींनी ती नम्रतेने पण प्रचंड विश्वासाने मांडली आहे. त्यांची मांडणी समाजापर्यंत, खास करून तरुणांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे आहे. तसेच “मुर्तीमधल्या देवाचे (तिथे तो असला तर) काय करायचं?”

“तिथे नसला तर काय करायचं?”

असे प्रश्न आहेतच. “माझा देवावर तसा विश्वास नाही पण काहीतरी शक्ती आहे हे खरं” असं म्हणणारे कित्येक जण मला रोज भेटतात. पण आपल्याला ना देवाबद्दलची जण असते ना त्या ‘अद्भुत’ शक्तीबद्दल. ह्या विषयांवरही उपनिषदांपासूनची एक मांडणी आहे.  त्याची प्रतिबिंबे, पडसाद हजारो वर्षे पडत आले आहेत.  ईशावास्त्रामधली तत्वे थेट शंकराचार्यांपासून, ज्ञानेश्वर, तुकाराम, परमहंस, विवेकानंद लोकमान्य, गांधीजी, विनोबा, ओशो, चिन्मयानंद, पांडुरंगशास्त्री, जग्गी वासुदेव, असे सारेजण त्यांच्या त्यांच्या शैलीमध्ये सांगूनही आशयाची एकात्मता कशी राखतात हे पाहिल्यावर मन थक्क होतं.

वेदान्त विचार आपल्याला अत्यंत रसरशीत, समृद्ध आणि व्यापक जीवन जगायला शिकवतो असे माझं मत बनलं आहे.  अर्थातच असं जीवन जगण्याचा तो एकमेव रस्ता आहे असा दावा ते शहाणे ऋषी करत नाहीत. आजच्या मानसशास्त्रामध्ये ‘Positive Psychology’ अर्थात ‘सकारात्मक मानसिकताशास्त्र’ नावाची शाखा रूढ होऊ पाहत आहे. आज ज्या वेगाने काळाचे आणि त्यातल्या तंत्रज्ञानादी घटकांचे गतिमान परिवर्तन होत आहे ते लक्षात होता, परंपरेमधल्या नेमक्या कोणत्या भूमिकांच्या मुले आंजचे आजचे जगणे अधिक समजूतदार आणि सहिष्णु होईल हे ठामपणे मांडणे गरजेचे वाटले.

त्यासाठी गेल्या सव्वा वर्षांमध्ये नव्याने साधन सामुग्री जमवली. वाचन सुरु केले. टिपणे काढत गेलो. डोळ्यासमोर काही, मूर्त असा पुर्वबिंदु दिसल्याशिवाय माझं मन सातत्याने काम करत नाही. Institute for Psychological Health, अर्थात् .आय.पी.एच. ह्या ठण्यातल्या संस्थेला २३ मार्च २०२० ला तीस वर्षे पूर्ण होत आहेत.  त्या निमित्ताने एक ‘ज्ञानयज्ञ’ करावा असा बेत केला. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मी आमच्या संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या जागे साठी निधी उभारणी करावी म्हणून, तीन संध्याकाळी अशी नऊ तासांची ‘सायंकाळची संवादमाला’ सादर केली होती.  तशीच मांडणी आताही करावी असे वाटले. पॉवरपॉइंटचे सादरीकरण करून बोलत गेलो तर कळायला सोपे जाते.  म्हणून ह्यावर्षी, १३, १४, १५ डिसेंबरच्या शुक्र, शनी, रविवारी रोज साडेतीनतास सादरीकरण  करावे असे उद्दीष्ट ठेवले आहे.

‘वेदान्तविचार आणि व्यक्तित्वविकास’ असे भारदस्त शीर्षक देऊन हे सादरीकरण करावे असे डोक्यात आले. पण ह्या शीर्षका मुळेच तरुणवर्ग आकर्षित होणार नाही असे लक्षात आले.  ‘माझ्या जमण्याचं नेमकं काय करायचं? हा प्रश्न मी ‘सह-शीर्षक’ म्हणून ध्यायचं ठरवलं. ह्या सादरीकरणातून आय.पी.एच संस्थेच्या, त्रिदशकापूर्वी निमित्त एक पायाभूत निधी उभारावा आणि तीस वर्षे पूर्ण होत आहेत तर पुढल्या वर्षभरामध्ये किमान तीस लाख रुपयांचे संकलन करावे असे योजले आहे.

अध्यात्मसाधनेतील प्रवासाला विनोबांचे नाव दिले आहे. ‘ब्रम्हविद्या’ एक दिवस विज्ञान आणि ब्रम्हविद्या एका भाषेत बोलतील असा त्यांचा विचार आहे. आधुनिक मेंदुविज्ञानाने माणसाच्या भावना आणि माणसाच्या Consiousness चा विविध अवस्था ह्यावर प्रकाश टाकला आहे. ह्या संस्थेचा धागा परंपरेतल्या सहाणपणाशी जोडणे हेही मला अतिशय अश्वासक करतं. माणसाची ‘माणुसकी’ जर विज्ञान आणि वेदांत एकाच पद्धतीने सांगू लागले तर ते किती मोलाचे ‘ऐक्य’ असेल. किती मोलाचे ‘अद्वैत’ असेल. वेदान्ताची परंपरा फक्त ‘ऐक्या’ची नाही तर तादात्मय ‘अद्वैता’ची आहे. द्वैत म्हणजे दुभाजन …. विभाजनाची सुरवात. एकदा शकले पडायल सुरवात झाली की एकता हरवते. मानवी संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या यात्रे मध्ये ‘एकरूप करणारे’ आणि ‘फोडून तोडून विलग करणारे’ असे परस्पर विरोधी प्रवाह प्रत्येक काळामध्ये उपस्थित राहिले आहेत. अध्यात्मिक सहजपणा शिकण्याची धुरा संतांच्या खांद्यावर होती आणि सामाजिक जबाबदारी त्या त्या क्षेत्रातल्या समाजसेवकांवर …. कधी ही दोन्ही रूपे अनेक माहात्म्यांमध्ये एकरूपही झाली… परंतु ह्यामध्ये मनमेंदु विज्ञानाला प्रत्यक्ष स्थान मिळाले नाही. आजच्या संक्रमणावस्थे मध्ये म्हणूनच ह्या अभ्यासाचे आणि सादरीकरणाचे एक दखलपात्र स्थान आहे असं म्हणावं लागेल.

“तु दहा-साडेदहा तास नेमकं काय बोलणार आहेस?” असा प्रश्न मला विचारलात तर त्याचे ‘सम्पुर्ण उत्तर माझ्या मनात नाही. माझ्या अभ्यासात मला जरा कुठे ‘share करायलाच हवं’ असे तत्व, तपशील, विचार मिळाला कि मला तो फक्त माझ्यापुरता सीमित ठेवणं स्वाभाविक वाटत नाही …. म्हणून व्यक्त व्हायचं. मनः पूर्वक मांडणी करायची: धागे जोडत जायचं.

आम्ही वैकुंठवासी। आलो या चि कारणासी।।
बोलिले जे ऋषी। साच भावे वर्तावया।।

असे तुकोबा म्हणतात. माझ्याकडे तुकारामांमधली कर्मयोगाची उंची आणि खोली नाही हे निखालस. पहिल्या ओळीमध्ये तुकाराम सांगतात तो आहे कर्मफलाचा आणि स्वामित्वधनाचा त्याग. परंतु दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलेला हेतू मात्र माझ्या हेतुशी जुळणारा विवेक माझ्या पाठीशी आहे. हा दिलासा घेऊन, मी तुम्हा सर्वांसमोर सादर करणार आहे, तीन संध्याकाळी आणि साडेदहा तासांची ही ‘मनउत्कर्ष संवादमाला.”

– डॉ. आनंद नाडकर्णी.

Venue: Samarth Sevak Mandal Ground, Shiv Samarth School, Talao Pali, Thane West.Time: 6.30p.m. to 9.30 p.m. on all three day i.e 13,14,15th Dec 2019.
Entry Pass: Rs.500/- for all three days.
For Booking your seat :
Contact: 9870600075  /  810447063. Whatsapp 9870115693
Mail id: vedhthane@gmail.com
For more details: vedhiph.com

गेलो देण्यासाठी पण…

दरवर्षी पंढरीला लाखो भक्त जातात आपल्या भक्तीचे दान द्यायला, पण अनुभव असा येतो, की-

विठ्ठलाच्या दारी यावे असे जाऊनिया
गेलो देण्यासाठी पण आलो घेऊनिया ||

अशी अनुभूती प्रत्येकच भक्ताला येते. आपल्या भक्तीचे दान द्यायला जावे पण उलट खूप काही मिळवूनच यावे. अगदी खरे सांगायचे तर २००७ साली ठाणे वेधमध्ये मी पहिल्यांदाच गेलो तेव्हाची माझी अनुभूती अगदी नेमकी याच शब्दात सांगता येईल. मी मारे ऐटीत गेलो मुलांना आणि पालक- शिक्षकांना मार्गदर्शन करायला, माझ्या यशाचे आणि अनुभवांचे संचित वाटायला, पण परत आलो तो स्वतःच समृद्ध होऊन. खूप काही मिळवून. याचे श्रेय आनंद नाडकर्णी या मित्राला. दोन अर्थाने- एक म्हणजे वेधची ही अफलातून संकल्पना त्याचीच म्हणून आणि दुसरं म्हणजे तो ज्या पद्धतीने मुलाखती घेतो त्यासाठी. सगळाच भन्नाट प्रकार आहे.

त्याचं झालं असं की २००६ साली, वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी मी लाखो रुपयांची नोकरी सोडून पूर्ण वेळ लेखन वाचन करत श्रेयसाची कास धरली आणि अनुभव मासिकात यावर लेख लिहिला. या उफराट्या निर्णयाचे मनोगत वाचून आनंदचा मला फोने आला, “अरे बाबा, आमच्या मुलांना सांग की तुझ्या या भन्नाट निर्णयाविषयी, तुझ्या कॉर्पोरेट क्षेत्रातील कामगिरीविषयी, आणि आता कसा मस्त जगतो आहेस  त्या विषयी.” मला काय, मी मोकळाच होतो आणि नव- निवृत्त असल्याने उत्साहाने फुरफुरत होतो. लगेच होकार कळवळा. (होकार कळवळा वगरे आता लिहितोय. त्या वेळी  मात्र मलाच इतका उत्साह आला, की काही करून आता आनंदचे मन बदलू नये आणि माझी ही संधी जाऊ नये अशीच प्रार्थना करत होतो!) आणि त्यानंतर आनंद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिलेला अनुभव शब्दातीत होता.

एखाद्या मुलाखतीची इतकी तयारी? बाप रे! मला लेखी प्रश्न काय पाठवले, मला वेधविषयी बरेच काही लिटरेचर काय पाठवले…. शिवाय आधी फोनेवर सविस्तर बोलणे काय झाले, शिवाय कोणत्या मुद्द्यावर जास्त बोलायचे आहे त्याविषयी चर्चा काय…. त्या तयारीने मी थक्कच झालो! मीही माझ्या कॉर्पोरेट पद्धतीने तयारीला लागलो. त्याच्या प्रश्नावलीची सविस्तर ऊत्तरे लिहून तयार तर केलीच, शिवाय माझ्या परीने काही विचार लिहून काढले. चक्क एक इन्स्पिरेशनल गाणे लिहून काढले. आयत्या वेळी त्या मुलांना सरप्राईज द्यायला म्हणून. चक्क त्याला चाल वगैरे लावून प्रॅक्टिस देखील केली. रूपक तालात बांधलेले ते ‘आओ चलो अब साथियो, मिलकर बढाएँ हौसला…’, अश्या ओळी असलेले ते गीत अजूनही आठवते मला. शिवाय माझा तपशीलवार बायोडाटा सुद्धा तयार करून आनंदला पाठवला.

प्रत्यक्ष वेधच्या दिवशी त्यांचे नियोजन पाहून  तर थक्कच झालो.  ठाण्यात राहणाऱ्या उमा पत्की या सख्ख्या मैत्रिणीला घेऊन मी कार्यक्रम स्थळी पोहोचलो आणि तिथला प्रचंड मोठ्ठा मंडप आणि जवळजवळ साडेतीन- चार हजारची गर्दी पाहून तर मी आश्चर्याने चकितच झालो. बापरे! मला कल्पनाच नव्हती मला इतक्या मोठ्या समूहासमोर बोलायचे आहे ते. त्यात साताठशे पालक आणि शिक्षक आणि उरलेली सर्व मुलं होती. इतक्या मोठ्या गर्दीसमोर जायचा हा माझा पहिलाच प्रसंग. ( कंपनीत साताठ कॅलीग्स समोर पावरपॉईंट प्रेझेंटेशन देण्यात मी वाकबगार होतो, पण इतक्या लोकांसमोर बोलायचा हा पहिलाच प्रसंग!) आनंदने मला स्टेजवर बोलावताच माझ्या शंका, भिती वगैरे सगळं कुठच्या कुठे पळून गेलं आणि मी चक्क त्याच्याशी मस्त गप्पा मारायला लागलो.

वेधमधल्या एका विलक्षण प्रथेनं मला सर्वप्रथम धक्का दिला. आनंदने त्या हजारो मुलांना सूचना दिली होती. वक्त्याच्या भाषणातले काही खूप आवडले की शांतपणे फक्त उजवा हात वर करायचा. आणि खूप गम्मत वाटली की टाळ्या वाजवायच्या. ( मी रीतसर तयारी करून गेलो असल्याने पहिल्या दोन- तीन मिनिटातच काही चमकदार बोललो तेव्हा एकदम समोर हजारो हात वर झालेले दिसले तेव्हा अक्षरशः अंगावर काटा आला.) मग मी आनंदला विनंती केली की मी या मुलांसाठी एक गाणे लिहून आणले आहे ते म्हणू का? आनंदने परवानगी दिली आणि माझ्याबरोबर ती सर्व मुले ते गाणे एक एक ओळ म्हणायला लागली तो अनुभव रोमांचक होता.

तसा आनंद मोठा चतुर आणि लबाड आहे बरं का! वेधमध्ये बोलावलेल्या वक्त्यांना तो खुश करतोच, पण ह्या माणसाकडून आपल्या मुलांसाठी काय काढून  घ्यावे हे त्याला नेमकं माहित असतं. थोडक्यत त्याचा ही ‘होमवर्क’ एकदम पक्का असतो. तो अश्या चतुराईने मुलाखत घेतो की आपल्या बोलण्यातून मुलांसाठी अगदी नेमकं आणि ‘फोकस्ड’ मागदर्शन तर व्हावंच, पण त्याला ‘पंतोजी छाप’ मागदर्शनाचा वास देखिल येऊ नये. मुलांना कशात रस आहे आणि त्यांना कशाचा फायदा होईल या दोन अपेक्षांचे भन्नाट मिश्रण करून ही मैफल रंगत जाते. खरंतर आनंदने १०/ १५ दिवस आधी वेधची संकल्पना, पद्धत वगैरे  सर्व लिटरेचर पाठवले होते. त्यात याआधी येऊन गेलेल्या वक्त्यांची यादी होती. ती नावे पाहूनच मला प्रचंड दडपण आले होते. कारण  ती यादी म्हणजे भारतातल्या एकेक लोकांचे ‘हूज हू’ वाटावे. मी तर इतका सामान्य की त्या यादीत माझे नाव मला तरी शोभून दिसेना. पण मुलाखतीच्या आधी, मुलाखती दरम्यान आणि त्यानंतर आनंद नाडकर्णी, वेधचे कार्यकर्ते आणि आयपीएच संस्था यांपैयकी कुणीच मला तसे जाणवू दिले नाही. लातूरच्या वेधमध्ये देखील मला तसाच अनुभव आला. धनंजय कुलकर्णी, दीपक पळशीकर वगैरे वेधच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी इतके विलक्षण आदरातिथ्य केले की गहिवरून यावे. अश्यावेळी आपण देखिल अंतःकरणाच्या तळापासून वेधमध्ये सामील होतो. मुलांना देता येईल तितके द्यायचा प्रयत्न करतो. हेच वेधच्या यशाचे रहस्य आहे.

ठाण्याच्या माझ्या पहिल्याच वेधमध्ये एक गम्मत झाली. मी बोलता बोलता सांगितले की ऑफिसमध्ये प्रचंड कष्ट करतानाच मी नेहमीच माझे छंद जोपासायचो. वयाच्या पस्तीसाव्या  वर्षी मी तबला शिकलो. तिथे आनंदने मला अचानक थांबवले आणि मिस्किलपणे म्हणाला , “अरे, संजय, खरंच तबला शिकलास का आमच्या पोरांवर इम्प्रेशन मारायला खोटंच  सांगतो आहेस?” त्यावर मी हसत म्हणालो, “अर्थातच खरंच शिकलो, कोई शक?” त्यावर तो गंमतीदारपणे म्हणाला, “आणि मी आता तुला इथे तबला वाजवून दाखवायला सांगितलं तर?” मी ही ऐटीत म्हणालो, “आणि मी खरंच वाजवून दाखवला तर?” खरी गम्मत पुढे आहे. त्याने खरंच कुणा कार्यकर्त्याला स्टेजवर तबला आणायला सांगितला आणि हसत हसत माला म्हणाला, “हं, वाजवा बरं!” तेव्हा मी एकतालातला एक कायदा वाजवला आणि समोर हजारो हात उंचावलेले पाहताना काय वाटले ते शब्दात सांगणे अवघड आहे.

वेधची कल्पना मुळात करिअर मार्गदर्शन असेलही पण मला दिसलेले वेधचे स्वरूप खूप व्यापक आहे. मुलांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास हे वेधचे खरे ध्येय आहे. कोणतीही भंपक औपचारिकता, ‘ग्यान देतोय’ असा आव, किंवा मार्गदर्शनाचा अभिनिवेश न बाळगता वेध मुलांसमोर काहीतरी चांगले मांडत  असते. त्यातून किती घ्यायचे, काय घ्यायचे आणि त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा ते मुलांच्या इच्छा आणि क्षमतेवर अवलंबून असते. त्या दिवशी माझ्या नंतर एका तरुण मुलीचे सत्र होते. असेल जेमतेम पंचविशीची. भारतातील अत्यंत ख्यातकीर्त (आसारामबापूला पकडण्यात आघाडीवर असल्याने अक्षरशः  सिलेब्रिटी म्हणावी अशी!) पोलीस अधिकारी असलेली ती मुलगी बोलायला लागली आणि माझ्यासह सगळे वाक्या वाक्याला दाद देत होते, टाळ्यांचा कडकडाट करत होते. आम्ही सगळेच भारावून गेलो होतो. वेधमध्ये असा अनुभव वारंवार येतो.

एक मात्र आहे,वेधच्या दर्शनी स्वरूपात केवळ आनंद नाडकर्णीचे नाव दिसत असले तरी या मागे कार्यकर्त्यांची, आयोजकांची एक मोठीच फळी कार्यरत असते. आता तर वेध ठाण्यापुरते मर्यादित नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होतो. त्या त्या ठिकाणी देखिल असे वेधक कार्यकर्ते मजबूत टीम बनवताना  दिसतात. शिवाय काळाबरोबर वेध अधिक तंत्रज्ञानाधारित आणि स्मार्ट होताना दिसत आहे. अतिशय नगण्य फी भरून मुलांना या प्रकल्पात  इतके काही मिळते की विश्वासच बसू नये. खरं सांगायचं तर वेधविषयी खूप दीर्घ लिहायला हवं, पण जता जाता एक सांगावेसे वाटते, की मी वेधचा भाग आहे या विषयी मलाच खूप अभिमान वाटतो, आनंद वाटतो. या पुढे मात्र हे कार्य अधिकाधिक संस्थात्मक होत जावे आणि योग्य ते डॉक्क्युमेंटेशन वेळच्या वेळी व्हावे (वेधचेच नाही तर आयपीएच करत असलेल्या विविध उपक्रमांचे) असे मात्र सुचवावेसे वाटते. उत्तम काम करणाऱ्या अनेक संस्था/ व्यक्तींप्रमाणेच आयपीएच आणि वेध प्रसिद्धीतंत्रात फारच पिछाडीवर आहेत हेही जाता जाता नमूद करतो. अश्या चांगल्या कार्यक्रमांचे यथायोग्य ‘मार्केटिंग’ करणे, अधिकाधिक दात्यांचा शहभाग मिळवणे या गोष्टी करण्यात काहीच गैर नाही. त्यातून हा उपक्रम अधिकाधिक मोठा  होत जाईल.  आधीच कुमार आणि किशोरवयीन मुलांसाठी आपल्याकडे फारसे काही होत नाही, तेव्हा अश्या उपक्रमांची (आजच्या आणि उद्याच्या) समाजाला नितांत गरज आहे. फार मोलाचे काम आहे हे. भविष्यात हे अधिकाधिक वाढत जायला हवे…… वाढतजाईल असा विश्वास आहे, त्यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. मी स्वतःला वेधचा अभिमानी सदस्य समजतो त्यामुळे भविष्यातही वेधक काम करायची संधी मिळावी अशी इचछा  तर आहेच . जाता जाता वेधविषयी इतकेच:

वेगवेगळी फुले इथे या सुरेख बागेत    
नाड्य आणि गरीब नांदती एका जागेत.
शाकडे सर्वांना न्यावे बागच बहारावी
ब्द असे की अलगद त्यांची गीते ही  व्हावी
स्वीकारावे चिमटीने आणि द्यावे दो  हातांनी.
होकारच द्या उद्यास, येईल यश सर्व दिशांनी ||

संजय भास्कर जोशी,
पुणे 

वेध ….. अनुभव … प्रवास…. ध्यास… कर्तव्य

मला आठवतं, ते साल असेल बहुतेक १९९५. माझी थोरली मुलगी सायली ‘आय पी एच’मध्ये  नुकतीच काम करू लागली होती आणि धाकटी मुलगी रीमा दहावीला बसली होती. आनंदचा आणि आयपीएच चा – खरंतर या दोन्ही अत्यंत एक रूप झालेल्या अशा संस्था आहेत. हो आनंद सुद्धा स्वतः मधेच एक संस्थाच आहे…कित्ती त्याच्यातले व्हर्टीकल्स आणि किती त्याचे काम! नुसतं ऐकून दमायला होतं! आणि तो प्रत्यक्ष सगळं करतो… तर त्यातलंच एक व्हर्टिकल म्हणजे वेध. १९९५ मध्ये रीमाला एक दिशा मिळावी म्हणून सायलीने त्या वर्षीच्या वेधच्या ऑडिओ टेप आणल्या होत्या घरी. आम्ही सगळ्यांनी त्या एकत्र बसून ऐकल्या.

त्या नंतर आमच्या घरी ही प्रथाच पडली.. टेप आणायच्या आणि ऐकायच्या. प्रवासाला निघालं की तर वेधच्या टेप्स गाडीत बरोबर घेतलेल्या असायच्याच. मी दर वर्षी वेधला एखादी संध्याकाळ तरी हजेरी लावायचे, पण सदाशिवला मात्र त्याच्या कामाच्या व्यस्ततेमुळे कधीच जमायचं नाही. पण त्याच्या डोक्यात वेध फिरत मात्र असायचा. एखाद्या वेगळं आणि चांगलं काम करणाऱ्या व्यक्ती बद्दल कळलं की आवर्जून आनंदला त्याची माहिती द्यायची असा नेमच त्यांनी धरला होता. पुढे मला आठवतंय एखाद्या वर्षी माझ्या मधल्या मुलीने – केतकीने – वेधच्या व्हिडिओग्राफीची पण जबाबदारी पार पाडली होती.

इथे मी नुसतं वेध म्हणतीये कारण तेव्हा वेध फक्त ठाण्यात होत होता. आमचं कुटुंब कोणत्या ना कोणत्या पद्धतीने वेधमध्ये पूर्ण पणे  रंगलं होतं. सदाशिवला तर वारंवार वाटायचं की हे विचार जर मी माझं करियर घडवत असताना मला मिळाले असते, तर मी अजून खूप वेगळा घडलो असतो. पण मोठ- मोठ्या व्यक्तींचे  विचार आम्ही आमच्या मुलींपर्यंत पोचवू शकतो, ही भावना खूप सुखावून जात होती. हे विचार अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत असे ही एकीकडे वाटत होते. विशेषतः आम्ही ज्या गावी वाढलो, तिथल्या मुलांना हे मिळालं तर खरंच खूप चांगलं होईल असं आम्हाला वाटत होतं…

साल होतं २००४. आमच्या शाळेतल्या वर्गमित्रांचं रियूनिअन होतं. तिथे सदाशिवने हा विचार बोलून दाखवला. आपण आपल्या गावच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायला हवं. त्याच्या डोक्यात जे फिरत होतं, ते त्याने बोलून दाखवलं.. नगरला वेध करायचा… आमच्या वर्गमित्रांनी लगोलग मान्यता दिली. मग आम्ही आनंदशी बोललो, तो ही तयार झाला.

सदाशिव झपाटल्यासारखा कमला लागला. स्पॉन्सर शोधणे, त्यांना राजी करण, गेस्ट आणणे, सगळं काही घरचच कार्य असावं असं- मनापासून आणि आपुलकीने आम्ही करत होतो.

२००५ साली नगरमध्ये पहिला वेध झाला. ठाण्याच्या बाहेरचा तो पहिला वेध. झालं. आमच्या घरातला तो एक वार्षिक उपक्रमंच झाला. वर्षभर त्यासाठी बौद्धिक पातळीवर कार्यरत राहावं लागे. नगरला फेरी झाली, की वेधची एक मीटिंग व्हायचीच… किंबहुना वेधसाठीच बऱ्याचदा नगरची फेरी व्हायची. हळू हळू रीमा सुद्धा पूर्णपणे वेधमध्ये सक्रीय झाली. २०१२ पासून गेस्ट आणायची जबाबदारी तिने पूर्णपणे स्वीकारली. हळू हळू नगरमधले इतरही समविचारी यात सामिल होऊ लागले. भरत जाधव पासून ते नागराज मंजुळे पर्यंत, आणि डॉ अभय बंगांपासून ते चेतना गाला सिन्हा, असे अनेक मान्यवर नगर वेधला लाभले.  

आठ वर्ष नगर वेध अश्या रीतीने चाललं…या काळात महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी वेध सुरु झाले आणि बहरले… आम्हाला सगळ्यांनाच याचा खूप आनंद होता, कारण जितक्या जास्त विद्यार्थयांपर्यंत वेध पोहोचेल, तितकेच सुजाण आणि विचार करणारे नागरिक तयार होतील. 

२०१४ सालचा वेध सदाशिव विना करावा लागला. तो गेला आणि महिन्याभरातच नगरचा वेध होता. त्याला त्या मंचावरून आदरांजली वाहायची वेळ माझ्यावर आली.. बट, द शो मस्ट गो ऑन !!!! आनंद सारखा भक्कम आधार तिथे असल्यामुळे, त्यातूनही पार झाले.

२०१५ साली रीमाच्या बाळंतपणामुळे, नगर वेध होऊ शकला नाही. २०१६ पासून मात्र आम्ही परत कार्यरत झालो. पण सदाशिव गेल्यावर आमच्या मित्रमंडळींचा उत्साह बराचसा कमी झाला, असं आमच्या लक्षात आलं. म्हणून मागच्या वर्षीपासून ‘स्व. सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्ट’ तर्फे सदाशिवच्या स्मरणार्थ वेध करायचा असं आम्ही ठरवलं.    

मागच्या वर्षीपासून नगर वेधची परत सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही.. म्हणूनच २०१८ सालची नगर वेध ची थीम होती “बॅक टू बेसिक”.

आता नगर वेधच्या टीममध्ये नवीन पिढीतले कार्यकर्ते सामिल झाले आहेत. हे कार्यकर्ते असे आहेत, ज्यांनी विद्यार्थी दशेत वेध अनुभवला आहे. नव्या पद्धतीने, नव्या उमेदीने, नवीन टेक्नोलोजी वापरून या वर्षीपासून वेध होणार आहे. आमच्या तीनही मुली यात संपूर्णपणे सहभागी आहेत. आमचे विचार आणि कार्य आता पुढची पिढी पुढे नेणार याचा आनंद काही औरच! त्यातलं महत्वाचं म्हणजे विवेकी विचारांचा प्रसार सुरु राहील. 

नगर वेधचे यश हे यात आहे, की वेध ठाण्याबाहेर जाऊ लागला. यंदा नगर वेधमध्ये विद्यार्थी म्हणून सहभागी असेलेले नचिकेत कुंतला, नाशिक वेधमध्ये फॅकल्टी म्हणून निमंत्रित होते. नगर वेधमध्ये विद्यार्थी म्हणून सहभागी होत असलेले असंख्य तरुण मित्रमैत्रिणी भेटतात… नगरवेधच्या अनुभवाबद्दल बोलतात, दिशा मिळाल्याबद्दल बोलतात.. ज्या हेतूने वेध सुरु केला, तो कुठेतरी साध्य होतोय असं वाटत असतानाच जबाबदारी वाढल्याची ही जाणीव नव्याने होते. आणि नगरच्या विद्यार्थ्यांसाठी वेध, हे आता आमच्या कुटुंबाचं कर्तव्यच झाल्याचं जाणवतं…. नो एक्सक्युझेस! 

हे सगळं जेव्हा मी मुलींशी बोलत होते, तेव्हाच यंदाच्या थीमचा विचार मनात आला आणि तो पक्का झाला… यंदाची थीम आहे “नो एक्सक्युझेस – नो सबबी”.  कोणतीही सबब किंवा कारणं न देता जे आपलं काम करत राहतात, अशा माणसांना बोलवायचं …

या वर्षीच्या फॅकल्टी मध्ये आहेत बीजमता राहीबाई पोपेरे, इसरो शास्त्रज्ञ प्रदीप देवकुळे, जन जागृती साठी “सोलो जर्नी” करणारी राखी कुलकर्णी , आदिवासी मुलांमधून स्पोर्ट चॅम्पियन तयार करणारा माण देशी चॅम्पिअन्स चा प्रभात सिन्हा आणि मराठी अभिमान गीत जग भर पोहोचवणारा संगीतकार व गायक कौशल इनामदार.

१७ नोव्हेंबरला माउली संकुल सभागृह, सावेडी, अहमदनगर येथे २०१९ चा नगर वेध होणार आहे. यंदाच्या वेधचा अनुभव हा नक्कीच सगळ्यांनी घ्यावा… नो एक्सक्युझेस!    

– श्रीमती सुनंदा अमरापूरकर.

Meeting with Dr. APJ Abdul Kalam, the President of India

It was 15.00 hours on 15th February 2003.  I was instructed to be at the upper gate of Raj Bhavan, Mumbai, (not at 3.00 pm but at 15.00 hours).

At the gate, I told the constable that I had an appointment at the Raj Bhavan, “With whom…?”  He asked.  “With the President of India…  “I answered.  He carefully looked at me and referred me to the security counter.  I was asked to give my visiting card.  Somebody there recognized me as ‘The doctor who comes on TV’.  My name was very much there on the visitor’s list.  I picked up the pass and started walking.

Raj Bhavan obviously has the ‘Raj’ touch everywhere, in architecture, in the smart uniforms of attendants, in the landscaping as well as in the general atmosphere.  Everyone was very courteous and friendly.  I was ushered in a waiting room where my name in the list was again checked.  Between 15.30 hours and 16.00 hours the president was going to meet a total number of six people.  There was a sitting MP, member of a popular family owned business group, editor of a weekly magazine and some families who wanted to meet the president.  Fortunately my name was above all these people and the order was followed very scrupulously.

Exactly at 15.35 I was taken to the presidential suite where joint chief protocol officer of Maharashtra state, shook hands with me.  He was the person who had called the previous afternoon to inform me that the President of India has granted audience to me.  All this was a result of letter posted to the president on 7th Feb. 2003, inviting him for our annual career conference “VEDH”.  Within a week the President’s office had granted me an interview with the President during his Mumbai visit.  I was taken to a small ante-room where I sat for the next five minutes.  The door opened and a smart Indian Air Force officer announced my name.

I entered the spacious room which was completely carpeted.  The President was wearing a suit shining in its off-white color.  He looked like an old and gracious Banyan tree.  He stood up, and extended his hands.  I touched his feet and he patted on my back.  We sat ‘exactly in a pose that we generally see on television as two heads of state sit, even the flower-arrangements were in place.  Other than the ADC, in that entire room, no one was present.  I introduced myself, work of IPH and talked about VEDH.

The President asked me about the differences between ‘a psychologist’ and ‘a psychiatrist’.  When I started explaining he quipped, “I know the ‘academic difference, tell me the functional difference”.  After my explanation he had another question, “Does the concept of mental health include mentally ill as well as mentally challenged?”  I had a chance to explain again.  When I used the word ‘destigmatization’, he again asked for an explanation. His voice was very soft and I felt as if I am talking to a grand-fatherly figure.

He asked me about the format of our career conference- ‘VEDH’.  I had taken photographs of previous years’ VEDH conferences with me.  I also gave him copies of the correspondence that we had with the President’s office. “Sir, we as a team of professionals and volunteers are working for the last thirteen years in this field with no godfathers, no foreign funding or backing from any industrial house…  We will be glad if you could interact with the students through our platform.

“December is a month of visits by foreign dignitaries.  Let me see what I can do… my office will get back to you…”  He said in the same cordial tone.

I gave him a copy of our Family Mental Health Guide & our IPH memento.  He shook hands with me.

“It is a moment of honor for me sir”, I murmured.
He smiled & patted on my shoulders.

“Keep up the good work” were his parting words.

I almost glided through that room towards the entrance; as if in a trance.  A simple citizen of this country on the basis of a single letter was able to meet the first citizen of India for full seven minutes and that too within a week of writing that letter…  unbelievable!…  But here I was, in the Raj Bhavan premises and the meeting had already taken place.

I did not know whether the President would have accepted our invitation but meeting him was something very very special.

I came back walking to the same gate from where I had entered Raj Bhavan; took a cab and right at the kemp’s corner flyover, traffic was halted.  The entire presidential cavalcade was passing by.  My driver said, “koi bada aadmi hoga…”

“President of India… Dr. A.P.J Abdul Kalam… Main thodi der pahale unke saath tha”…  I could not withhold that information.

He stared at me in complete disbelief.  I took my VVIP entry pass and presented it to his astonished self.

I called up my wife on the cell phone.  “How was the meeting?”  She asked.

“Dreamlike…”  I answered.

There are some dreams from which you do not want to be woken up.

-Dr. Anand Nadkarni

The Journey Within

What do you mean by a ‘hobby’? I had asked my teacher when I was in the primary school. “That’s something you like doing”, she replied. I like watching cartoon, my innocence thought, is that my hobby? But a more sensible mind replied, ‘I don’t think so’.
Since then, I did stick to the meaning of hobby that my teacher had told me but I wasn’t convinced….it didn’t seem logical at all. Because I liked lakhs of things.

Having many hobbies at the same time somehow did not project loyalty to me. But when asked by anyone what my hobbies were, I named a few things like watching TV, playing, drawing and so on. While answering however, I somewhere felt like I was cheating on something. But what is that something? My 6 year old brain had no idea whatsoever. Naturally, I stopped thinking on that issue as finding answers to very difficult questions was not my hobby at all!

It all came back to me at VEDH a few years ago. I smiled when I saw the stage. There was the backdrop and on it was ‘Chhandananda’. The picture portrayed a fragile boy sitting alone at the point of a cliff and playing the flute. The picture was so soothing and motivating at the same time. The boy seemed to have no fear of falling down from the cliff. His fragile frame indicated to me that he would have neglected the calls of his stomach just to be with his flute. His body gave an impression of a slight swing to it, a clear sign that he enjoyed what he was doing. I could see from his hands, so lightly placed on his flute, that the job was effortlessly being done by him. The background of blue created an aura of peace and self- fulfillment. I loved that picture instantly. That actually, was enough for me to know what a hobby really means.

It is not mere liking but a source of immense happiness. Isn’t that what ‘Chhandananda’, the combination of the words ‘Chhanda’ and ‘Ananda’, mean? Even the order of these words is significant! Chhanda is followed by Ananda.

A hobby is your very source of motivation. It is not possible to just sit on your beloved bicycle and cover 25 states without being highly motivated; as did Sachin Gaonkar. A hobby is something that you can go on doing for a lifetime, however complicated the task might be. A hobby is what makes your life better. A hobby is something you like talking about. Madhur Padwal’s excitement while talking about his instruments is unforgettable.

All these things were clear to me in two days. I was marveled at how satisfied these people were with themselves. How well they knew themselves. What they liked, what they wanted from life. It seemed that every time they indulged in their hobbies, they were a step closer to finding themselves. They were at peace with themselves and the world. And all this just because they had a hobby? What else is a hobby if not a form of spirituality?

I left the program with an answer. I now knew the real meaning of the word ‘hobby’. But that answer gave rise to a new question-what is my hobby? When I attended the program, this was an important question that was sowed in my brain, and to which, I didn’t have an answer. Today, after a lot of introspection, contemplation and maybe as a product of trying out different things, I can say my hobby is to learn foreign languages. This answer came to me after I started learning German.

VEDH is has always been very special to me. It has always forced me to find answers to existential questions. Every year, I leave the auditorium with questions and in the process of attending the next few VEDH programs, I find answers to those previous questions, too! Such is the magic of VEDH.

– Ketaki Joshi,
Budding Volunteer,
Pune VEDH

वेध आणी मी- एक सहप्रवास

२०२० मध्ये होणाऱ्या शंभराव्या वेध ची बातमी बघितली आणि माझ्या डोक्यातून पावलापर्यंत एक सुखद संवेदना सळसळली. होय, पुणे वेध सुरु झाले २०११ साली. ‘यशवंतराव’चा पडदा वर गेला आणि हसत हसत, ‘सुस्वागतम्’ म्हणत डॉक्टर. आनंद नाडकर्णी यांनी क्षणार्धात प्रेक्षकांचे मन जिंकले. पहिलाच कार्यक्रम ‘सृजनशीलता व सर्जनशीलता’ हे सूत्र घेऊन संपन्न झाला. सुचेता चे कष्ट, सलील कुलकर्णी व संदीप खरेचे गाण्याचे गुळपीठ, अभिजीत ची जिद्द, रेणुका चेतन, सर्वच भन्नाट. एवढा उच्च दर्जा पहिल्याच कार्यक्रमाने दाखवून दिला.

‘प्रतिकूल- अनुकूल’ परिस्थितीत आपला ‘मकसद्’ पूर्ण करण्यासाठी ‘स्वप्नांच्या वाटेवर’ असणाऱ्या ह्या बहुगुणी व्यक्ती ‘स्व च्या पलीकडे’ जाऊन समाजाचं ऋण फेडत आहेत. या सर्वांनी त्यांच्या कामात त्यांचा ‘छंदानंद’ शोधला. खडतर वाट सुद्धा आपली करून जंगल बसवण्याचा वसा घेतलेला, सच्चा दिलाचा  जादव पायेंग, आनंद शिंदे चे हत्ती प्रेम, “माझं प्रिय वाद्य म्हणजे माझा श्वास”, असं म्हणणारे तौफिक कुरेशी, याच बरोबर येल्लो गर्ल गौरी गाडगीळ, सोनम वांगचुंग अश्या अनेक अनुभवसंपन्न व्यक्ती विसरू म्हटले तरी नाही विसरता आल्या. काश्मीर व भारतातील जातीवादाचा भस्मासुर विसरून माणुसकीचा पूल बांधणारे सारंग गोसावी, यास्मिन आणि युनूस, यांचा अनुभव ऐकताना उर भरून आले. पुणे वेध मध्ये पेश झालेल्या अश्या किती रत्नांची नावे सांगू? नद्या वा जलस्रोत धोरणांची आखणी आणि अंमल बजावणी करणारे मौलिक सिसोदिया, ‘एलिझाबेथ एकादशी’ च्या मधुगंधा कुलकर्णी. ‘जीवन हेच संगीत व संगीत हेच जीवन’ हे अमर ओक आणि मधुर पाडवळ या दोघांनी दाखवून दिले. तेजस गुप्ते, कमांडर दिलीप दोंदे, यांची जिद्द व कष्ट करण्याची ताकद हे बघून, देवाने ह्यांना कोणत्या मिश्रणाने बनवले आहे, असा मला प्रश्न पडला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णी आणि त्यांच्या सहकारी डॉ. ज्योती शिरोडकर यांची मुलाखत घेण्याची पद्धत. ते दोघेजण या अवलियांच्या एकनिष्ठतेचे, चिकाटीचे, ध्यासाचे, मूल्यांचे, गुणांचे एकेक पदर कौशल्याने उलगडत जातात. आपल्या डोळ्यांसमोर एका सुरवंटाचे फुलपाखरूत रूपांतरच होत आहे जणू!

ह्या सगळ्या मुलाखतींमधून एक जाणीव होते; ती म्हणजे ह्या सगळ्या व्यक्तींनी अनेक शारीरिक, मानसिक व आर्थिक अडचणींवर मात करत, स्वतःला तावून सुलाखून घेत जीवनाला सोन्याची चमक आणली आहे ह्याची.

पुणे वेधचे कार्यक्रम हे नेहमी एक सकारात्मक संदेश देणारे, जगाकडे आणि स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारे, सामाजिक भेदभाव आणि जातिधर्मांच्या भिंतींपलीकडे बघायला प्रवृत्त करणारे असतात. आयुष्याला दिशा देणाऱ्या ह्या वेध च्या बोधचिन्हामधील बाण अगदी पूरक आहे.

मला कायम वाटतं, सख्या सोयऱ्यांना, मित्र मैत्रिणींना आपण अनंद साजरा करण्यासाठी बाहेर मेजवानीसाठी घेऊन जातो त्या ऐवजी त्यांना ह्या कार्यक्रमाला घेऊन यावे व त्यांचा आनंद द्विगुणित करावा.

गेल्या काही वर्षात जसं वेध बरोबर माझं नातं घट्ट होत गेलं, तसं पुणे वेध आयोजित करणाऱ्या  पळशीकर  दाम्पत्त्याशी माझा संवाद वाढला. हे दाम्पत्त्य मनमिळावू तर आहेच, शिवाय सहकाऱ्यांना आपल्या समवेत घेऊन जाण्याचे कौशल्या ही त्यांच्याकडे आहे. त्यांचे सहकारी विनासायास, तत्परतेने, आनंदाने मदतीचा हात देऊन वेध चा कार्यक्रम यशस्वी करताना मी पहिले आहे.

वेध म्हणजे मनाचा वेध, आपल्या असीम स्वप्नांचा वेध, स्व च्या पलीकडे जाण्याचा वेध लावून जातो.

पुढच्या वेध ची आतुरतेने वाट पहाते,

मृदुला पराडकर,
कॅनडा.

Design a site like this with WordPress.com
Get started